![Sanjay Raut](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F07%2FUntitled-design-2023-07-15T105006.992.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळीनंतर उद्धव ठाकरेंच्या राज्यभर सभा होतील, शरद पवार गट अजित पावर गटाला धूळ चारणार. बारामतीचं मैदान शरद पवार मारतील, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
निष्ठा हा आमचा प्राण आहे. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोनचं नेते आहेत. दुसरीकडे, नरेंद्र मोदी राहुल गांधीवर चर्चा करतात, हेच राहुल गांधींच यश आहे. निष्ठावंत घाबरून पळून जाणार नाहीत. आम्ही आयुष्यभर ठाकरेंसोबत राहू, असे संजय राऊत म्हणाले.