पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. राज्यात आज गुढीपाडवा आणि नववर्ष उत्साहात साजरे केले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभेत बोलत होते. महाराष्ट्रातील करोनाचे सर्व निर्बंध कमी झाल्यानंतर आज पहिल्यांदाच राज ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.