पुढारी ऑनलाइन डेस्क : राहुल गांधींना भारताच्या इतिहासाची माहिती नाही. त्यांनी वीर सावरकरांसाठी ज्या प्रकारचे शब्द वापरले आहेत त्यावरून त्यांची विचारधारा दिसून येते. ते देशद्रोही, हिंदुद्रोही आहे. लोक त्याचा बदला घेतील, असे आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी अंजार, जिल्हा कच्छ येथे म्हटले आहे. एएनआयने शर्मा यांचे कोट ट्विट केले आहे.
सध्या गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहे. त्याच्या प्रचारासाठी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा हे गुजरातच्या कच्छ येथे आले आहे. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर टिका केली.
ते पुढे म्हणाले, गुजरातमध्ये निवडणुका आहेत पण ते (राहुल गांधी) दक्षिणेत फिरत आहेत, जेव्हा हिमाचल प्रदेशात निवडणुका होत्या तेव्हा ते केरळमध्ये होते. त्यांना ड्रेसिंग रूममधून बाहेर पडायचेच नाही आहे कारण त्यांना निवडणुकीत लढायचेच नाही, असे म्हटले आहे.
सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेत आहे. ही यात्रा केरळ ते कन्याकुमारी अशी आयोजित केली आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. यावेळी अकोला तसेच अन्य ठिकाणी पत्रकार परिषदेसोबत बोलत असताना, सावरकरांवर टिका केली होती.
हे ही वाचा :