पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. राज्यात पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. आता भाजपच्या पराभवाची आणि काँग्रेसच्या विजयाचे विश्लेषण राजकीय वर्तुळात सुरु झाले आहे. कर्नाटकात मिळालेल्या यशावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, कर्नाटकमध्ये सत्तेवर येणे ही एक मोठी जबाबदारी आहे. आम्ही कर्नाटकमधील जनतेला काही आश्वासने दिली आहेत. आता आम्हाला ती पूर्ण कारायची आहेत. आम्हाला लोकांसाठी काम करायचे आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील का, या प्रश्नावर बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या, आम्हाला लोकासाठी काम करायचे आहे. पुढे काय होईल, हे देशातील जनताच सांगणार आहे.
हेही वाचा :