जी-२० संमेलनामुळे ५ ते १५ सप्टेंबर पर्यंत दिल्लीकरांना असुविधेचा सामना करावा लागेल; यासाठी आताच क्षमा मागतो, अशा शब्दांत पंतप्रधानांनी माफी मागितली. जागतिक संमेलनामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे, अनेक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोकण्यात येणार आहे. परंतु, घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा घरातील मोठ्या सोफ्यावर आपण बसत नाही. पाहुण्यांना आपण सोफ्यावर बसण्याचा मान देतो. याचप्रमाणे जी-२० संमेलनासाठी भारतात येणारे प्रत्येक प्रतिनिधी आम्हा सर्वांचे पाहुणे आहे. त्यांच्या स्वागताने आपला गौरव वाढेल,