सर्वोच्च न्यायालयात दोन न्यायमूर्तींच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

सर्वोच्‍च न्‍यायालय संग्रहित छायाचित्र.
सर्वोच्‍च न्‍यायालय संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तेलंगण उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्जवल भुईया तसेच केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. भट्टी यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. न्यायमूर्ती भुईया यांचा कार्यकाळ २ ऑगस्ट २०२९ पर्यंत तर न्यायमूर्ती भट्टी यांचा कार्यकाळ ६ मे २०२७पर्यंत असेल.

वरील दोन्ही न्यायमूर्तींच्या नियुक्तीनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची एकूण संख्या 32 वर गेली आहे. या नियुक्त्यानंतरही न्यायालयातील न्यायमूर्तींची दोन पदे रिक्त आहेत. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील कॉलिजियमने गत 5 जुलै रोजी न्यायमूर्ती भुईया व न्यायमूर्ती भट्टी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदासाठी शिफारस केली होती.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news