दुबई; पुढारी ऑनलाईन : आशिया चषकातील सुपर ४ च्या सामन्यात भारताने माजी कर्णधार विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्तानला १८२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या (४४ चेंडूत ६० धावा) बळावर भारताला ७ बाद १८१ धावांचा टप्पा गाठता आला. भारताच्या फलंदाजांनी सुरुवाती पासून मोठे फटके मारत रनरेट चांगला ठेवला. १२ षटकानंतर विकेट्स गमावल्याने भारत थोडा अडखळताना दिसला. पण, विराट कोहली आणि दीपक हुडा यांनी अखेरच्या षटकात केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे भारताने आव्हानात्मक ७ बाद १८१ स्कोर उभा केला.
पाकिस्तानचे निमंत्रण स्विकारत भारताच्या सलामीवीरांनी पहिल्या ५ षटकांमध्ये ५४ धावांची नाबाद सलामी दिली. यानंतर दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहूल प्रत्येकी २८ धांवाची खेळी करत बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यांन काही काळ डाव सांभाळला. त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात सुर्यकुमार १३ धावांवर बाद झाला. यांनतर पंतला सोबत घेत कोहली याने ११ व्या षटकात संघाच्या १०० धावा फलकावर लावल्या. पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात ऋषभ पंत १४ धावांवर बाद झाला. त्याच्या नंतर आलेल्या हार्दीक पंड्या देखिल आल्या आल्या माघारी परतला. तो मिडऑनला झेल देत शुन्यावर बाद झाला.
Live Update : India vs Pakistan
भारताचा संघ (Asia Cup 2022)
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दीक पंड्या, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, रवी बिश्नोई, भूवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग
पाकिस्तानचा संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फकर जमान, इफ्तीकार अहमद, खुर्शिद शाह, शादाब खान, असिफ अली, मोहम्मद नवाज, हारिश राऊफ, हसन अली.