मतभेद विसरून विरोधी पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज: कपिल सिब्बल

मतभेद विसरून विरोधी पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज: कपिल सिब्बल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सर्व प्रकारचे मतभेद विसरून विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी रविवारी (दि.२१) सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांच्या शपथविधीच्या सोहळ्यास विरोधी पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पण अशा प्रकारची उपस्थिती पुरेशी नाही. विरोधी पक्षांची एकता यापेक्षा व्यापक असणे आवश्यक आहे. विरोधकांना प्रभावीपणे एकत्र यावयाचे असेल, तर त्यांनी समान कार्यक्रम राबविले पाहिजेत. त्याशिवाय पक्षीय मतभेद विसरुन त्यांनी एकत्र काम करणे तितकेच गरजेचे आहे, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news