![नाशिक : खा. राऊत जनतेचा दिवस खराब करतात – खा. श्रीकांत शिंदेची घणाघाती टीका](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F04%2F333.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत हे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जनतेचा दिवस खराब करतात. राऊत यांच्या बोलण्याचा लाेकांना विट आला आहे, अशी घणाघाती टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राउतांवर केली.
सत्ताधारी शिवसेना व भाजप यांनी छत्रपती संभाजीनगर येथून सावरकर गाैरव यात्रा काढणार आहे. ठाकरे गटाचे खा. राऊत यांनी यात्रेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करताना दाढी काढून यात्रेत सहभागी व्हावे, असे वक्तव्य केले होते. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रविवारी (दि.२) नाशिकमध्ये आलेल्या डॉ. शिंदे यांना राऊतांच्या वक्तव्यावर विचारले असता ते काय बोलतात त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. पण सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत जनतेचा दिवस खराब करण्याचे काम राऊत करतात. तसेच त्यांचे बोलणे आम्ही मनावर घेत नाही, अशी टीका शिंदे यांनी केली.