गुरुंच्या आशीर्वादाने भारताला नवीन उंचीवर घेऊन जावे : पंतप्रधान मोदी

गुरुंच्या आशीर्वादाने भारताला नवीन उंचीवर घेऊन जावे : पंतप्रधान मोदी

पुढारी ऑनलाइन डेस्क : गुरुंच्या आशीर्वादाने भारताला नवीन उंचीवर घेऊन जावे, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून व्यक्त केली आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन गुरुंना अभिवादन दिले.

यावेळी पंतप्रधानांनी ट्विट करून आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा देत म्हणाले, आम्ही भगवान बुद्धांच्या उदात्त शिकवणीचे स्मरण करतो आणि न्याय आणि दयाळू समाजाची त्यांची प्रबुद्ध दृष्टी साकार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.

तसेच गुरू पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देत म्हणाले, हा दिवस सर्व अनुकरणीय गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. आम्हाला मार्गदर्शन केले आणि आम्हाला खूप काही शिकवले. आपला समाज शिक्षणाला खूप महत्व देतो. आपला गुरुंचा आशीर्वाद भारताला नवीन उंचीवर घेऊन जावेत.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news