प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील ५ जणांचा निर्घृण खून

प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील ५ जणांचा निर्घृण खून
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील तरवाईच्या खैवाजपूर गावातील एकाच कुटुंबातील ५ जणांचा अमानुषपणे खून केल्याची घटना घडली आहे.  मारेकऱ्यांनी घरातील एका खोलीला आग लावली. घरातून धूर निघत असल्याचे पाहून ही घटना उघडकीस आली. पती- पत्नी, मुलगी, सून आणि २ वर्षांची नात हिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या सर्वांवर धारदार शस्त्रांनी वार करून ठार मारण्यात आले आहे. या सर्वांना निर्दयपणे ठार  करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.

राम कुमार यादव ( वय ५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (वय ५२), मुलगी मनीषा (वय २५), सून सविता (वय २७) आणि नात मीनाक्षी (वय २) अशी खून झालेल्यांची नांवे आहेत. तर दुसरी नात साक्षी ( वय ५)  आहे. हे हत्याकांड कोणी व का केले, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. प्रयागराजचे डीएम आणि एसएसपी आणि इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. डोक्यावर जबर मारहाण करून सर्वांचा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तर तरुणीवर बलात्कार झाल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या घटनेचा उलगडा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, याआधी १६ एप्रिलला प्रीती तिवारी ( वय ३८) आणि तिच्या तीन मुली माही (वय १२), पिहू (वय ८) आणि कुहू (वय ३) यांची प्रयागराजमधील नवाबगंजमधील खगलपूर गावात गळा चिरून हत्या केली होती.पती राहुल तिवारी (वय ४२) लटकलेले आढळून आले होते. ही घटना ताजी असतानाच आता एकाच कुटुंबांतीव पाच जणांची हत्या झाल्‍याने प्रयागराजमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news