ईशान्येकडील राज्य असणार्या मणिपूरच्या हिंसाचाराला नऊ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे; मात्र आजतागायत तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यात आणि हिंसाचारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. परिणामी, तेथे दररोज हिंसाचार उसळतो आणि लोक मारले जातात. जमाव पोलिस ठाण्यांवर आणि विशेष दलाच्या चौक्यांवर हल्ले करतात, शस्त्रे लुटतात आणि त्यांना नियंत्रित करण्यात सुरक्षा दले अयशस्वी ठरतात, हे चित्र वारंवार दिसत आहे.