नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना शुक्रवारी (दि.२५) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. लालूंचा जामीन रद्द करण्याच्या सीबीआयच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय ऑक्टोबरमध्ये निकाल देणार आहे. त्यामुळे तूर्तास त्यांना दिलासा मिळाला आहे.
लालू यादव यांचे वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात किडनी प्रत्यारोपणाचा हवाला देत म्हटले की, सीबीआयला लालूंना पुन्हा तुरुंगात पाठवायचे आहे का ? याला विरोध करताना सीबीआयच्या वकिलाने लालू यादव बॅडमिंटन खेळत असल्याचे सांगितले. त्यांना जामीन देण्याचा निर्णयही चुकीचा होता. हे मी खटल्यादरम्यान सिद्ध करेन. आता या प्रकरणावर १७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
लालू यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालूप्रसाद तुरुंगातून बाहेर आले आहेत. सीबीआयने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चांगली आहे. छायाचित्रांमध्ये ते बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. याआधी चारा घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही लालू यादव यांना मोठा दिलासा दिला आहे.
हेही वाचा