आजरा: पुढारी वृत्तसेवा : आजरा तालूक्यातील पूर्व भागातील सरोळी, निंगूडगे व गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर या एका मार्गावरील गावातील सुमारे १५ पेक्षा अधिक चारचाकी अज्ञातांनी फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गाड्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kolhapur News
याबाबत आजरा पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, निंगुडगे ते सरोळी येथे जाणा-या रस्त्यावर सोमवारी (दि. २५) मध्यरात्री गाड्या फोडल्या. यावेळी दगडाने काचा फोडून साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये निंगुडगे येथील बाळू बोलके, महेश देसाई, प्रकाश मगदूम, सुनील देसाई, सरोळी येथील डॉ. विजय पाटील, बाळासाहेब पोवार, रमेश देसाई, एस.आर.पाटील तर ऐनापूर येथील सुनील कुराडे, राजू कडाकने, सदाशिव कागवाडे यांच्या गाड्यांचा समावेश आहे. Kolhapur News
यावेळी गाडीचे नुकसान करुन पळून जात असताना सुमंत सरदेसाई यांना गाडीची काच फुटल्याचा आवाज आला. त्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या समोरुन दोन अज्ञात व्यक्ती पळून जाताना दिसले. याबाबत सरदेसाई यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पुढील तपास आजरा पोलिस करत आहेत.
कुटुंबासाठी व हौसेखातर सेकंडहँन्ड गाड्या घेतल्या होत्या. अर्थिक परिस्थिती बेताचीच असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या फोडल्या आहेत. दारूचे व्यसन असणा-या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीकडून हे कृत्य झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा