पुढारी ऑनलाईन डेस्क : अवकाळी पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे. भरपाई देण्यासाठी २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर पर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय आज (दि.२९) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंत्रालयात आज दुपारी प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. State Cabinet