दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरून, महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्ती यांच्याबाबत आजवर केवळ भाजपच्याच नेत्यांनी अनेकदा वादग्रस्त आणि आक्षेपार्ह व्यक्तव्य केली आहेत. याच यादीत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भर पडली. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, अशा आशयाचं धादांत खोटं विधान त्यांनी केलं. माझी या भाजपवाल्यांना विनंती आहे ही, एकतर महाराष्ट्रातील संत आणि थोर व्यक्तींचा इतिहास आधी समजून घ्या आणि नंतरच बोला, आणि इतिहास माहीत असूनही जाणीवपूर्वक खोटं बोलत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.