![antara - malhar](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2Fwhatsapp-image-2022-01-07-at-11.26.59_202201750600.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : जीव माझा गुंतला मालिकेत मल्हार – अंतराच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. (Jeev Majha Guntala) शितोळे कुटुंबाला होणारा त्रास मल्हारला बघवत नसल्याने तो अंतराचं घर सोडून वेगळं रहण्याचा निर्णय घेणार आहे. त्याला अंतराची साथ मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघांच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. हा प्रवास मल्हारसाठी जास्त आव्हानत्मक आणि खडतर असणार आहे. (Jeev Majha Guntala)
आजपर्यंत मल्हारला अंतराने प्रत्येक संकटात साथ दिली आहे आणि आता देखील त्याला अंतराची खंबीर साथ मिळणार आहे. अंतराने मल्हार सरांना वचन दिले आहे, "सीतेने भोगला वनवास रघुरामचंद्राच्या साथीने, वचन देते अंतरा राहील कायम मल्हार सरांच्या सोबतीला". वनवासात अंतरा मल्हारला साथ देणार आहे. बघूया त्यांचा हा नवा प्रवास कसा राहील ? त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल? अंतराच्या साथीने मल्हारचा हा वनवास कसा होणार सुखकर. हे पाहणे रंजकतेचे ठरेल.