नाशिक पुढारी ऑनलाइन : दिंडोरी येथील जवान प्रसाद कैलास क्षीरसागर यांना अरुणाचल प्रदेश येथे वीरमरण आले आहे. अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत असताना गाडीचा ब्रेक फेल झाल्याने गाडी एका खोल दरीत कोसळली. या घटनेत प्रसाद यांच्या सोबत आणखी दोन जवानांना वीरमरण आल्याची माहिती मिळते आहे.
उद्या रात्री सव्वा दहा पर्यंत प्रसाद यांचे पार्थिव मुंबई येथे आणले जाईल. त्यानंतर लष्करी वाहनाने ते त्यांच्या मूळगावी दिंडोरी येथे आणण्यात येईल.