प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) या नावाने प्रसिद्ध असलेल्या आर्थिक समावेशावरील राष्ट्रीय मिशन २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आले आणि त्याला जवळपास ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. बँकांनी सादर केलेल्या ताज्या अहवालानुसार ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत एकूण जन धन खात्यांची संख्या ५० कोटींच्या पुढे गेली आहे. यापैकी ५६% खाती महिलांची आहेत आणि ६७% खाती ग्रामीण/निमशहरी भागात उघडण्यात आली आहेत, अशी माहिती 'पीआयबी'ने दिली आहे.