मालदीवमध्ये पोहोचणार्या पर्यटकांच्या बाबतीत गेल्या तीन वर्षांत पहिल्या क्रमांकावर असलेला भारत आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतीय पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे मालदीवचे दोन अब्ज डॉलरपर्यंत नुकसान होऊ शकते. कोणतीही कारवाई न करता भारताने चीनप्रेमी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईज्जू यांना चांगलाच धडा शिकवला आहे. आता त्याचा परिणाम मालदीवच्या आधीच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. परिणामी, भारतासोबतचे संबंध लवकरात लवकर सुधारावेत, अशी मागणी मालदीवमध्ये वाढू लागली आहे. भारताविरुद्धच्या राजनैतिक वादाने मालदीवचे कंबरडे मोडले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मालदीवला भेट देणार्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च 2024 मध्ये 27,224 च्या तुलनेत मार्च 2023 मध्ये 41,000 हून अधिक भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली आहे.