पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : भारत घुसखोरीचे उत्तर देणार नाही, अशा धुंदीत चीन असेल तर ती त्यांची चूक ठरेल, असे मत माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी व्यक्त केले आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा प्रयत्न गेल्या आठवड्यात भारतीय सैनिकांनी हाणून पाडला होता. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ( India China Border Clash )
वृत्तसंस्थेशी बोलताना विजय गोखले म्हणाले की, चीनच्या प्रत्येक कु-कारस्थानाला उत्तर देण्याची ताकद भारतामध्ये आहे. गलवानमधील संघर्षानंतर प्रत्येक मोर्चावर भारत सज्ज आहे. ऑगस्ट २०२० मध्ये रेजांग ला येथे 'स्नो लेपर्ड काउंटर' ऑपरेशन करण्यात आले होते. भारताने हे ऑपरेशन मुद्दामहून केले होते. चीनला या ऑपरेशनची माहिती नव्हती. त्यावेळी भारतीय सैनिकांनी पेंगोंग त्सो तलाव परिसरात चीनी सैनिकांना माघार घ्यावयास भाग पाडले होते. अशा स्थितीत छोट्या-मोठ्या गोष्टी करुन प्रत्युत्तर केल्यावर भारताकडून प्रत्युत्तर मिळणार नाही, अशा भ्रमात चीनने राहू नये. असेही त्यांनी स्पष्ट केले. ( India China Border Clash )
हेही वाचा :