पुढारी ऑनलाईन डेस्क : रेशन कार्डच्या ( Ration Card ) सहाय्यनाने देशभरातील अनेक गरीब कुटुंबांना मोफत व रास्त भावात अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. हे रेशन कार्ड राज्य शासनाच्या वतीने बनवले जाते. आपले रेशन कार्ड हे आपल्या आधार कार्ड सोबत जोडलेले असते. ज्यामध्ये आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या अंगठ्याच्या स्कॅनद्वारे त्या कुटुंबाला महिन्याचे अन्नधान्य दिले जाते. सरकाने आता देशभरात रेशन कार्डद्वारे देशभरात कोठेही अन्नधान्य देण्याची व्यवस्था सुरु केली आहे. रेशन कार्ड लोकांना इतर अनेक प्रकारच्या सुविधा मिळण्यासाठी उपयोगी ठरते.
रेशन कार्ड ( Ration Card ) प्रत्येकांसाठी खूप महत्त्वासाठी आहे. अनेक वेळा रेशन कार्ड अपडेट करणे अथवा कुटुंबाच्या रेशन कार्डमध्ये नव्या व्यक्तींचे नाव समाविष्ट करणे अनेकांसाठी जिकिरीचे बनते. अनेकवेळा लोक काही एजंटांकडे हे काम देऊन स्वत:ची फसवणूक देखिल करुन घेतात. पण रेशन कार्डमध्ये अपडेट करणे व नव्या व्यक्तींचे नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.