पुढारी ऑनलाईन डेस्क : पाणी हा पृथ्वीवरील आणि सजीव जीवनातील महत्वाचा घटक आहे. पाणी हे मानवी शरीराला आवश्यक असणारे प्रमुख द्रव्य आहे. प्रत्येकाच्या शरीराला पाण्याची आवश्यकता ही वेगवेगळी असते. तज्ज्ञांच्या मतानुसार मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण हे अधिकांश म्हणजेच ६६ टक्के असते. प्रत्येक व्यक्तीचे वय आणि वजनानुसार प्रत्येकाच्या शरीराला लागणारे पाण्याचे प्रमाण हे भिन्न असते, त्यामुळे साधारण प्रत्येकाने दिवसभरात दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. चला तर जाणून घेऊया आरोग्यदायी शरीरासाठी पाणी किती आणि कसं प्यावं…