कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या हंगामातील 400 रुपये देणे शक्य नाही. यावर्षी जर कोणी कमी देत असेल तर ते वाढवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगत ऊस दरावरून विनाकारण संघर्षाचे वातावरण निर्माण करू नका, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केले. जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊस दर आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करत याबाबत राजू शेट्टी, सतेज पाटील, विनय कोरे यांच्याशी संवाद सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.