पुणे, पुढारी वृत्तसेवा: सरकारने जाहीर सभांसाठी कोणतीही मैदाने बंद (ब्लॉक) केली नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. फडणवीस हे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांसाठी पुणे विमानतळावर दाखल झाले, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील एकूणच परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मत मांडले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच मैदाने बंद ठेवली आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले, सरकारने असा कुठलाही निर्णय घेतला नाही. कुणी कुठेही सभा घेऊ शकते. अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक रशियातील मास्को शहरात होत आहे. ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब असून, त्यासाठी मी व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जाणार आहोत.