तेल अवीव, वृत्तसंस्था : आमच्याविरुद्ध जग एकवटले तरी हमासचा शेवटचा दहशतवादी संपवून टाकत नाही तोवर आम्ही गाझावरील हल्ले थांबविणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला.
आम्ही सुरुवात केलेली नाही; पण शेवट मात्र आम्ही करू. हे युद्ध आम्हाला कधीच नको होते. आम्हाला जीवन आणि विकास प्रिय आहे; पण रक्त आणि मृत्यूचे थैमान प्रिय असलेल्या हमासी क्रौर्याने आमचे सणासुदीत दंग असलेले 1400 वर लोक एका दिवसात ठार मारले. आता आम्ही युद्ध थांबविले तर ते हमासच्या क्रौर्यासमोर शरणागती पत्करल्यासारखे होईल, असेही नेतान्याहू यांनी स्पष्ट केले. हमाससारखे क्रौर्य समूळ संपविल्याखेरीज आम्ही शांततामय भविष्याची हमीच आमच्या जनतेला देऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.