डॉ. बाबासाहेबांचा गौरव म्हणून त्यांचा पुतळा कोल्हापुरात उभारावा, यासाठी डॉ. आंबेडकर पुतळा प्रतिमा समितीची स्थापना करण्यात आली. भाई माधवराव बागल यांच्या अध्यक्षतेखालील समितीत तत्कालीन नगराध्यक्ष द. मा. साळोखे, मा. ई. कुरणे, भिवा सरनाईक, गणपत पोवार, गंगाराम कांबळे, व्ही. जी. चव्हाण, यशवंत सुळगावकर, शांताराम सरनाईक, शामराव बनगे, बळवंत सरनाईक, मसू लिगाडे, मा. ता. मोरे, बाळ चव्हाण, रामकृष्ण कदम, सहदेव बनगे, चंद्रकांत लिगाडे, हरी सरनाईक आदींचा समावेश होता. या समितीने देशाची राजधानी दिल्ली येथे जाऊन डॉ. आंबेडकरांची भेट घेऊन कोल्हापुरात पुतळा उभारणीविषयी सांगितले. मात्र, बाबासाहेबांनी याला नम्रपणे नकार दिला. यामुळे समितीचे सदस्य नाराज झाले. याची माहिती मिळताच डॉ. आंबेडकरांनी समिती सदस्यांना परत बोलावून पुतळ्यासाठी परवानगी दिली.