पुढारी ऑनलाईन : दिवाळी आली की सगळ्यांनाच वेध लागतात चटपटीत, चविष्ट मिठायांचे. दिवाळीचे पदार्थ आजकाल वर्षभर सगळीकडे उपलब्ध असले तरी दिवाळीच्या दिवसात त्यांचा आस्वाद घेण्याची मजाच काही और आहे. दिवाळीच्या पदार्थांची प्रत्येकाची अशी खासियत असते. चकली, चिवडा हे अनेकांचे लाडके पदार्थ असतात. पण या सगळ्या पदार्थांच्या भाऊगर्दीत करंजी मात्र आपलं स्थान टिकवून आहे. अर्धचंद्र आकाराची ही मिठाई अनेकांची खास लाडकी असते. पण या करंजीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? करंजीला वेगवेगळी नाव आहेत. तिचा पहिल्यांदा उल्लेख १३ व्या शतकात आढळतो. पण त्यावेळी त्या उन्हात सुकवून खाल्ल्या जायच्या. तर काहीजण यांची तुलना तूर्किश मिठाई बकलावा यांच्याशीही करतात.
तर भारतात याचं साधर्म्य उत्तर भारतीय गुज्जीया सोबत जोडलं जातं. या देशभरात विविध नावं आहेत. करंजीला छत्तीसगडमध्ये कुसली, बिहारमध्ये पेडकिया, आंध्र प्रदेशात कज्जिकयालू अशी नावे आहेत. उत्तर भारतात गुज्जीया हा प्रकार होळीला बनवला जातो. तर दक्षिण भारतात हा प्रकार दिवाळीत बनवला जातो.
हेही वाचा :