सलमानचे सिनेमे त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची मेजवानी असतात. त्यामुळेच मोठे मुहूर्त साधत रिलीज होणा-या सिनेमांना चाहते ही चिक्कार गर्दी करताना दिसतात. यातच त्याच्या आणखी एका सिक्वेलची घोषणा झाली आहे. सिक्वेल आणि रिमेक यात रमलेल्या सलमानच्या आणखी एका सुपरहिट सिनेमाच्या सिक्वेलची स्क्रिप्ट तयार झाली आहे.
२००५ मध्ये सलमानची मुख्य भूमिका असलेला मल्टीस्टारर 'नो एंट्री' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता जवळपास १७ वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येऊ घातला आहे. या सिनेमासंदर्भात दिग्दर्शक अनिस बज्मी यांनी मोठी अपडेट समोर आणली आहे. अनिस यांनी 'नो एंट्री'च्या सिक्वेलची म्हणजे 'नो एंट्री मे एंट्री'ची घोषणा केली आहे.
अनिस यांनी ही स्क्रिप्ट सलमानलाही ऐकवली असून त्यालाही ती आवडल्याचं त्यांनी शेअर केलं आहे. नो एन्ट्रीमध्ये सलमानसह अनिल कपूर, लारा दत्त, फरदीन खान, इशा देओल आणि बिपाशा बासू यांच्या भूमिका होत्या. अनिस यांनी ही स्क्रिप्ट सलमानला ऐकवली असून सलमाननेही या सिनेमाला संमती दिल्याचं समोर येत आहे.
अनिस यांचं दिग्दर्शन असलेली 'भुलभुलैय्या २' नुकतीच रिलीज झाली आहे. आणखी एक सिक्वेल या निमित्ताने अनिस यांच्या खात्यात जमा झाला आहे. अनिस बज्मी सध्या चर्चेत आहेत ते आणखी एका रिमेकमुळे. अनिस यांनी दिग्दर्शित केलेला भूलभुलैय्याचा सिक्वेल नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाचं नाव भुलभुलैय्या २ आहे. कियारा आडवाणी, तब्बू आणि कार्तिक आर्यन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.