साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाहेर खाणे कमी करावे. बाहेर खाणे होत असेल तर कोणत्या कारणाने बाहेर खाता आणि काय खाता यावर लक्ष द्या. अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे. जेवण तयार करताना तेलाचा अतिवापर टाळावा तसेच साय, तूप यांचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ खाऊ नयेत. जेवण करताना थाळीचे प्रमाण लक्षात ठेवा. जेवणाच्या ताटात 2 भाग भाजी असली पाहिजे, एक भाग प्रथिने म्हणजे डाळ, पनीर किंवा अंडे असावे. एक भाग धान्याचा म्हणजे पोळी, ज्वारी, बाजरी यांचा समावेश असावा.