बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
शुक्रवारी रात्री उशिरा समाजकंटकांनी बिरणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्याची विटंबना केली. ही बाब सकाळी निदर्शनास आली. या ठिकाणी संगोळी प्रेमी मोठ्या संख्येने जमा होत आहेत. वाढणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुतळा साफ केला. मात्र या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.