नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव नाना शंकरशेठ टर्मिनस करावे, अशा विनंतीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लेखी उत्तरादाखल दिली.
नामांतराबाबतचे प्रस्ताव वेगवेगळ्या राज्यांकडून येत असतात. यावर सरकारी संस्था आणि संबंधितांशी विचारविमर्श करुन निर्णय घेतला जातो, असे सांगतानाच मुंबईतील नाना शंकरशेठ प्रतिष्ठानकडून मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव नाना शंकरशेठ टर्मिनस असे करण्याचा प्रस्ताव मिळाला नसल्याचे राय यांनी नमूद केले.
हेही वाचा :