पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकीकडे उष्णतेच्या झळा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी जोरदार बरसणार आहे. 14 मेपर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणच्या काही भागांत पाऊस हजेरी लावणार आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. दरम्यान, राज्यात उष्णतेच्या झळा, उकाडा सुरूच असून, बुधवारी (दि. 8) अकोला शहरात राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 43.5 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले आहे.