सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन होत आहे. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. मात्र, न्यायालयाने व महाराष्ट्र सरकारने घालून दिलेल्या नियमांमध्येच शर्यतींचे आयोजन करण्याची सक्ती केली आहे. पशुसंवर्धन आयुक्त, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना याबाबत आदेश जारी केले आहेत. सध्या ग्रामदैवतांच्या यात्रा संपत आल्या असून, बरेच ठिकाणी वाढदिवसाच्या यात्रांना सुरुवात झाली आहे; परंतु शासनाच्या अटी पाहता, वाढदिवसाच्या यात्रांना खो बसणार आहे.