Assassins of Rajiv Gandhi : राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची तीन दशकानंतर तुरुंगातून सुटका

Assassins of Rajiv Gandhi : राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची तीन दशकानंतर तुरुंगातून सुटका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी असलेल्या ६ जणांची सर्वोच्च न्यायालयाने ३१ वर्षानंतर तुरूंगातून सुटका केली आहे. आरोपी नलिनी श्रीहरन, मुरूगन श्रीहरन आणि संथन यांच्यासह ३ जणांची शनिवारी (दि.१२) संध्याकाळी वेल्लोरच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली. नलिनीने पॅरोलच्या शर्तींनुसार सकाळी एका स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरीही लावली. (Assassins of Rajiv Gandhi)

सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात या प्रकरणातील ७ वा आरोपी पेरारिवलन याची सुटका करण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर केला होता. दरम्यान आज आरोपींची सुटका करताना त्याच निकालाचा आधार घेतला आहे. तामिळनाडूच्या मंत्रीमंडळाने २०१८ मध्ये राज्यपालांना या आरोपींची सुटका करण्याची शिफारस केली होती. राज्यपालांनी ही शिफारस मान्य केली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नलीनी श्रीहरन, संथन मुरूगन, रॉबर्ट पायस आणि आरपी रविचंद्रन हे तुरूगांत शिक्षा भोगत होते. (Assassins of Rajiv Gandhi)

सर्वोच्च न्यायालयाने आरोपींबाबत म्हटले की, त्यांनी चांगला व्यवहार केला, पदवी प्राप्त केली. पुस्तके लिहिले आणि समाजसेवाही केली. याबाबत नलिनी श्रीहरन यांचे भाऊ बकियानाथन म्हणाले, मारेकऱ्यांनी यापूर्वीच ३० वर्षे शिक्षा भोगली आहे. मानवाधिकारांच्या आधारावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. जे लोक त्यांच्या सुटकेचा विरोध करत आहेत. त्यांनी भारतीय कायद्यांचा सन्मान करायला हवा. (Assassins of Rajiv Gandhi)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news