अकोला, पुढारी वृत्तसेवा : बालविवाहात सहभागी लग्नपत्रिका छापणारे, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक, पौरोहित्य करणारे व व-हाडी मंडळी अशा सर्वांवर गुन्हे दाखल होतात. जिल्ह्यात कुठेही बालविवाह झाल्यास त्यात सहभागींना तुरूंगात जावे लागेल, असा इशारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी दिला आहे.