Kangana Ranaut : ‘अमिताभ बच्चन यांच्यानंतर इतका आदर कुणाला मिळत असेल तर ती मी आहे’; कंगना ट्रोल

कंगना रानौत
कंगना रानौत

पुढारी ऑनलाईन डेस्क : कंगना रानौतच्या एका स्टेटमेंटमुळे नेटकरी ट्रोल करत आहेत. ती म्हणाली, इंडस्ट्रीमध्ये बिग बीनंतर लोक जर (Kangana Ranaut) कुणावर प्रेम करत असतील आणि इतका आदर करत असतील तर ती मी आहे. तिच्या या दाव्याने देश इतका आश्चर्यचकित झाला आहे की, लोक तिला आता ट्रोल करत आहेत. (Kangana Ranaut)

अमिताभ बच्चन यांच्याशी आपली तुलना केल्याने कंगना रनौतला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. एका नेटकऱ्याने प्रश्न उपस्थित केला की, जर त्यांना नाही तर काय ….देशात सन्मान मिळाला असता? एका रॅलीमध्ये कंगनाने म्हटले होते की, हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन यांच्यानंतर ज्याना आदर मिळतो, ती मी आहे. या विधानावर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे.

कंगना रानौतने आपलया इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, मी स्पष्ट म्हटलं होतं की, भारताच्या अनेक राज्यात मी जिथे जाते, तिथे एक आर्टिस्ट म्हणून भावूक करणारे प्रेम आणि आदर मिळतो. न केवळ माझा अभिनय तर महिला सशक्तीकरणासाठी माझ्या कामाचेही कौतुक सगळीकडे होते. त्यांना माझा एक प्रश्न आहे. भारतात बिग बी यांच्यानंतर जर मी नाही तर हिंदी चित्रपटात कुणाला इतका आदर मिळतो? खान लोक वा कपूरांना? कुणाला? कृपया तुम्ही मला सांगू शकाल? तर मला सर्वात जास्त आदर मिळतो.

काय म्हणाली कंगना?

"मी राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली किंवा मणिपूरला कुठेही गेले तरी लोक माझ्यावर प्रेम करतात. माझा इतका आदर करतात की ते पाहून संपूर्ण देश आश्चर्यचकित झाला आहे. अमिताभ बच्चन यांच्यानंतर चित्रपटसृष्टीत इतकं प्रेम आणि आदर जर कुणाला मिळत असेल तर ती मी आहे."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news