पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील अनगूळ, बेळगाव येथील पाच भाविक चार चाकी गाडीने पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने आज (दि. १०) पहाटे १.३० वाजता कासेगाव (ता. पंढरपूर) फाटा येथे अपघात झाला. या अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमी भाविकांवर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रा. अंनगुळ ता. जि. बेळगाव येथील आहेत.
या अपघातात राजू संभाजी शिधोलकर (वय ४५), परशुराम संभाजी जवरूचे (५०) हे ठार झाले आहेत, तर चालक राजकवी कृष्णा मधुकर (२३), गीतेश पोकंशेकर (२६), अभिजित हुंम्बरे (२८) हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.