टाकळी अंबड : आषाढी एकादशीच्या पर्वावर श्री विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे शुक्रवारी (दि.२८) दुपारी चार वाजता ज्ञानेश्वर महाराज मंदिरातून श्रीक्षेत्र आपेगावहून पंढरपूरकडे प्रस्थान होईल.
यंदा या पालखी सोहळ्याचे ८४५ वर्ष आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान श्रीक्षेत्र आपेगावचे अध्यक्ष अध्यात्म विवेकी गुरुवर्य ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व दिंडी प्रमुख भानुदास महाराज कोल्हापूरकर यांच्या नेतृत्वाखाली हा पालखी सोहळा निघणार आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, नगर बीड, उस्मानाबाद, सोलापूर या पाच जिल्ह्यातून या पायी वारीचा एकूण २७० किलोमीटरचा पायदळ प्रवास असून एकूण १९ दिवसांचा प्रवास, मुक्काम असणार आहे. या पायी दिंडी सोहळ्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार महिला, पुरुष भाविकांचा मोठा सहभाग असणार आहे.
हेही वाचा