नाना पटोले आंबेडकरांना म्हणाले, द्यायचा तर मग सर्वच जागी पाठिंबा द्या!

नाना पटोले
नाना पटोले

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा काँग्रेसच्या उमेदवारांना समर्थन द्यायचेच आहे तर वंचित बहुजन आघाडीने सगळ्याच जागेवर द्यावे, ठराविक नाही. साताऱ्याबाबत चर्चा नाही. कोणाचा कुणाशी संबंध आहे? ते योग्य वेळी सांगू अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अकोल्यात रविवारी ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांना लक्ष्य केल्यावरून आज पटोले यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मविआच्या सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती. काल बैठक झाली. दिल्लीतून काय चर्चा झाली, ते आदेश देणार, त्याचे पालन करू, प्रकाश आंबेडकर यांना आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही. त्यांना द्यायचे असेल, तर ते देऊ शकतात.

मी पण वंचित आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला व्यक्तिगत टॉर्चर केले जात आहे. हे काही बरोबर नाही, त्याचे उत्तर योग्य वेळी देऊ असे स्पष्ट कतानाच रामटेकमध्ये आता रश्मी बर्वे विषय संपला आहे. आता काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत ते नक्की निवडून येतील असा दावा पटोले यांनी केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news