सर्वसामान्य गरीब माणसांसाठी पुकारलेल्या लढ्याला यश आले. अनधिकृत बांधकामधारकांना न्याय मिळावा. शास्तिकर सरसकट माफ व्हावा, यासाठी आंदोलन पुकारले होते. शहरातील नागरिक यात सहभागी झाले. मुंबई, नागपूर, शहरात वारंवार आंदोलने केली. चौकाचौकांत आंदोलने केली. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी मोठे आंदोलन केले. त्याला 12 वर्षे झाली. पण, आमच्यावरील दाखल गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी आम्हाला आजपर्यंत न्यायालयात जावे लागत होते. न्यायालयाच्या पायर्या चढाव्या लागल्या असल्या, तरी शहरातील अनधिकृत बांधकामधारकांना न्याय देऊ शकलो. सरसकट शास्तिकर माफ करण्यात यश मिळाले, याचे समाधान आहे.
– श्रीरंग बारणे, खासदार, मावळ
अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम रोखण्यासाठी आणि शास्तिकर लागू नये, यासाठी 2011 मध्ये तीव्र आंदोलन केले. आमच्या लढ्याला यश आले आहे. निवासी, व्यावसायिक मालमत्तांचा शास्तिकर सरसकट माफ झाला. जिझीया शास्तिकर शून्य झाला आहे. सर्वसामान्यांना मोठा लाभ झाला आहे.
– नामदेव ढाके, सरचिटणीस, भाजप