Odisha Accident Railway Board Press Conference : 'अपघातातील जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना आतापर्यंत ३.५ कोटी रुपयांची आर्थिक मदत हस्तांतरित' - जया वर्मा | पुढारी

Odisha Accident Railway Board Press Conference : 'अपघातातील जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना आतापर्यंत ३.५ कोटी रुपयांची आर्थिक मदत हस्तांतरित' - जया वर्मा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Odisha Accident Railway Board Press Conference : ओडिशातील रेल्वे अपघातातील जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना आतापर्यंत ३.५ कोटी रुपयांची आर्थिक मदत हस्तांतरित करण्यात आली आहे, अशी माहिती जया वर्मा सिन्हा, संचालन आणि व्यवसाय विकास सदस्य, रेल्वे बोर्ड यांनी दिली आहे. त्याबरोबरच त्यांनी रेल्वे अपघाताच्या कारणाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली आहे. जया वर्मांच्या माहितीनुसार, सिग्नलमध्ये बिघाड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र हेच कारण आहे हे अद्याप खात्रीशीर सांगता येत नाही. सीआरएस अजून तपशीलवार अभ्यास करत आहेत.

ओडिशातील रेल्वे अपघातानंतर जया वर्मा आणि अन्य सदस्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी जया वर्मा यांनी अपघातातील जखमी तसेच मृतांच्या नातेवाईकांना आतापर्यंत ३.५ कोटी रुपयांची मदत हस्तांतरित केली आहे. यामध्ये किरकोळ जखमींना ५०,००० रुपये तर गंभीर जखमींना २००,००० रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना १०,०००० रुपये देण्यात आले आहे. वितरण प्रक्रिया अजूनही सुरू आहे. यामध्ये २८५ लोकांना ३.२२ कोटींचे वितरण आम्ही आतापर्यंत केले आहे. एकूण ६ केंद्रांवर वितरण करण्यात आले आहे.

Odisha Accident Railway Board Press Conference : सिग्नल यंत्रणेत बिघाड असल्याचा प्राथमिक अंदाज

अपघाताच्या प्राथमिक कारणांमध्ये सिग्नलमध्ये बिघाड असल्याचा अंदाज आहे. मात्र, याविषयी अधिकृतपणे खात्रीशीर सांगता येत नाही. कारण अजूनही कारणांचा शोध घेणे, मिळालेल्या माहितीचा अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) याचा अभ्यास करत आहेत. ते रिपोर्ट सबमिट करतील तेव्हाच अधिकृतपणे सांगता येईल.

Odisha Accident Railway Board Press Conference : अपघातात अडकलेल्यांच्या नातेवाईकांनी 139 क्रमांकावर संपर्क करावा

आमचा हेल्पलाइन क्रमांक १३९ उपलब्ध आहे. हा कॉल सेंटर नंबर नाही, आमचे वरिष्ठ अधिकारी कॉलला उत्तर देत आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. जखमी किंवा मृतांचे कुटुंबीय आम्हाला कॉल करू शकतात आणि आम्ही त्यांना भेटू शकतील याची खात्री करू. त्यांचा प्रवास आणि इतर खर्च आम्ही करू, अशी माहिती जया यांनी दिली आहे.

याशिवाय कवच, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमबद्दल त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. ‘कवच’ ही उत्तम सिस्टिम आहे. या अपघातात ‘कवच’ प्रणाली का उपयोगी पडली नाही, याबाबत त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.

हे ही वाचा :

Odisha Train Accident : आईच्या मृतदेहाला बिलगून रडता-रडता अडीच वर्षाच्या चिमुकल्याने दम तोडला; अपघातातील हृदय पिळवटणाऱ्या कहाण्या

Odisha Train Accident : भविष्यात अपघात टाळण्यासाठी रेल्वेला मिळणार सुरक्षा ‘कवच’; जाणून घ्या नेमके काय आणि कसे आहे हे ‘कवच’

Back to top button