कापसाच्या पेरणीकडे शेतक-यांचा कल असून, सरासरीच्या तुलनेत 67 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. सोयाबीनचीही 61 टक्के, तर तुरीची 44 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. या पिकांची सर्वाधिक पेरणी झालेले जिल्हे क्रमाने पाहिल्यास, कापसाची यवतमाळ, जळगाव, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, सोयाबीनची लातूर, नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, तर तुरीच्या पेरणीत यवतमाळ, अमरावती, नागपूर, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होतो.