भारत जोडो यात्रा स्थगित | पुढारी

भारत जोडो यात्रा स्थगित

जम्मू : जम्मू-काश्मिरातील रामबनमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने काँग्रेसची भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे रस्ते बंद आहेत. यामुळेच यात्रेचा दुसरा टप्पा स्थगित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. आता ही यात्रा शुक्रवारी (दि. २७) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.

Back to top button