पत्नी आणि दोन मुलांचा कुर्हाडीचे घाव घालून खून; मृतदेह घरातच पुरले
रतलाम; वृत्तसंस्था : घरगुती भांडणातून पत्नी, मुलगा आणि मुलीचा कुर्हाडीचे घाव घालून खून करून त्यांचे मृतदेह घरातच पुरणार्या एकाला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात हा प्रकार घडला. दोन महिन्यांपूर्वी झालेले हे हत्याकांड शेजार्यांना आलेल्या संशयामुळे उघडकीस आले.
रतलामचे पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी सांगितले की, खुन्याच्या शेजारी राहणार्या लोकांना त्याच्या कुटुंबातील सदस्य अनेक दिवसांपासून न दिसल्याने व त्याने वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय आला. यानंतर काहींनी पोलिसांना ही माहिती सांगितली. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतल्यावर त्याने केलेला प्रकार सांगितला.
तिवारी म्हणाले की, पती-पत्नीत सारखे वाद होत असत. दोन महिन्यांपूर्वीही असाच वाद झाला. त्याने रागारागात पत्नी, सात वर्षांचा मुलगा व चार वर्षांची मुलगी यांची कुर्हाडीचे घाव घालून हत्या केली. यानंतर घरातच या सर्वांचे मृतदेह पुरले.घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी घरात खोदकाम करून रविवारी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत.