पुढारी ऑनलाईन डेस्क : रायगड जिल्ह्यात साकव कोसळल्याने दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २६) दिली. उरण तालुक्याजवळील धुतूम गावाजवळ कोसळल्याने चार मुले अडकली, त्यापैकी दोन मुले ढिगाऱ्याखाली दबले गेले आणि जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. Raigad Sakav Collapsed
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले की, "उरणजवळील धुतूम गावाजवळ साकव कोसळल्याने चार मुले अडकली होती. त्यापैकी दोघांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित दोघांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे मृत्यू झाला."
हेही वाचा