CBSE semester 2 : इयत्ता दहावी, बारावी परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी
पुढारी ऑनलाईन डेस्क : सीबीएससीकडून दुसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. cbse.gov.in. अधिक माहिती आणि अपडेट मिळवण्यासाठी असेल असे सांगण्यात आले आहे. (CBSE semester 2)
CBSE semester 2 : महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे
कोरोनाच्या नियमांमध्ये शिथीलता दिल्याने सेमिस्टर १ ला १२ विद्यार्थांना वर्गात बसण्याची परवानगी होती ती आता १८ करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स, मास्क आणि टेम्परेचर तपासणी याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बोर्डाने तीन-टप्प्यात व्हेरीफिकेशन प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
इयत्ता १० वी आणि १२ वी सेमिस्टर २ ची परीक्षा दोन तासांची सकाळी १०:30 ते दुपारी १२:३० या वेळेत हाेईल.
विद्यार्थ्यांनी नियुक्त परीक्षा केंद्रांवर सकाळी ९:30 पर्यंत पोहोचायचे आहे. १० वाजता परीक्षा केंद्रात आपल्या जागेवर बसण्याची सूचना देण्यात आली आहे. यानंतर मुलांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश बंद केला जाईल आणि कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत आत प्रवेश दिला जाणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.
मंत्र्यानं मागितलं ४० टक्के कमिशन, पीएम मोदींना पत्र लिहित कंत्राटदाराची आत्महत्या; कर्नाटकात खळबळ https://t.co/RXxfZCxFei #pudharinews #pudharionline #PMmodi
— Pudhari (@pudharionline) April 12, 2022
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सकाळी १० वाजता वितरीत केल्या जातील जेणेकरुन ते उत्तरपत्रिका काळजीपूर्वक भरतील आणि प्रश्नपत्रिका देखील पाहू शकतील.
CBSE बोर्डाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्याला २० मिनिटांचा वाचन वेळ दिला जातो.परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना CBSE रोल नंबरसह सर्व बाबी सर्टिफिकेट नमूद केलेल्या तपासल्या जातील. यामध्ये संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची तसेच विद्यार्थांची स्वाक्षरी असेल.ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर सही नसेल त्या विद्यार्थांना प्रवेश नाकारला जाईल असे सांगण्यात आले आहे.