बंगळूर : पुढारी वृत्तसेवा, पंक्चर होऊन रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरला टाटा सुमोने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १३ जण ठार झाले. त्यात ९ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. चिक्कबल्लापूरजवळ गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. सर्व मृत आंध्र प्रदेशचे आहेत. (Karnataka Accident)
संबंधित बातम्या
अनंतपूर जिल्ह्यातील हे मजूर कामासाठी बंगळूरकडे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनाने टँकरला धडक दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी एस. पी. नागेश यांनी दिली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत.
गुरुवारी पहाटे बंगळूरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चिक्कबल्लापूरच्या हद्दीत हा अपघात झाला.