ठाणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात वीस हजार शाळांना अनुदान देण्याची घोषणा सर्वप्रथम 2012 ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना झाली होती; मात्र आज 12 वर्षांनंतरही दहा हजार शाळा अनुदानापासून वंचित आहेत. यामध्ये सर्वाधिक 1 हजार 533 शाळा पुण्यामध्ये, नाशिक येथे 1 हजार 599, तर छत्रपती संभाजीनगर येथे 2 हजार 749 या भागात आहेत.