दरडोई उत्पन्नात राज्यात कोल्हापूर नंबर 7

दरडोई उत्पन्नात राज्यात कोल्हापूर नंबर 7
Published on
Updated on

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

चिपळूण, समीर जाधव : राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील प्रत्येक नागरिकावर 56 हजार 880 रुपयांचे कर्ज आहे. आतापर्यंत राज्यावर 7 लाख 7 हजार 472 कोटी इतके कर्ज असून त्याचा भार राज्याच्या तिजोरीला सोसावा लागत आहे. राज्यातील दरडोई उत्पन्न आणि कर्जाचा भार लक्षात घेतल्यास काही जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढत असून राज्यात कोल्हापूर सातव्या क्रमांकावर आहे.

केंद्र सरकारच्या अर्थ व सांख्यिकी संचलनालयातर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर 'समर्थन' या स्वयंसेवी संस्थेने तयार केलेल्या अहवालात वरील निष्कर्ष काढला आहे.

[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

सन 2015 ते 2024 या कालावधीचा विचार केल्यास प्रत्येक आर्थिक वर्षात महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढतच आहे. आर्थिक वर्षनिहाय कर्जाची वाढ बघितली तर 2015-16 मध्ये 28 हजार 843, 2016-17 मध्ये 32 हजार 457, 2017-18 मध्ये 35 हजार 802, 2018-19 मध्ये 36 हजार 223, 2021-22 मध्ये 43 हजार 372 इतके कर्ज वाढत आहे.

उत्पन्न आणि खर्च यामध्ये तफावत होत असल्याने कर्जाचा बोजा वाढता आहे. त्यामुळे विकासावर प्रतिकूल परिणाम होत असून विकासात असमतोल निर्माण झााला आहे. नंदूरबार व मुंबई या जिल्ह्यांमध्ये मोठी आर्थिक दरी निर्माण झाली आहे.

सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये नंदुरबार, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश होत आहे तर पुणे, ठाणे आणि मुंबईचे दरडोई उत्पन्न हे सर्वाधिक आहे.

याचा परिणाम राज्याच्या विकासावर होत असून महसुली व भांडवली जमा यामध्ये दिसणारी तूट यामुळे विकासाच्या खर्चावर मर्यादा येत आहेत. क्षेत्रनिहाय खर्चात तब्बल 23 हजार 466 कोटींची कपात करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसत आहे. कृषी व संलग्न सेवेमध्ये 18.75, ग्रामीण विकासासाठी 22.89, विशेष क्षेत्र विकासासाठी 40.61, पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी देखील 17 टक्क्यांनी निधी कमी करण्यात आला आहे. ऊर्जा विभागासाठी 26 टक्के, उद्योग आणि खाण विभागासाठी तब्बल 50 टक्क्यांनी निधी कमी करण्यात आला आहे. परिवहनसाठी मात्र 21 टक्क्यांनी निधी वाढला आहे.

विज्ञान- तंत्रज्ञानावर देखील 29 टक्के निधी खर्च झाला आहे. वाढत्या कर्जामुळे विकासावर विपरीत परिणाम होत असून क्षेत्रनिहाय खर्चात तब्बल साडेतेवीस हजार कोटींची कपात करण्यात आली आहे. परिणामी ग्रामीण विकासाला निधी कमी उपलब्ध होत आहे. या शिवाय सामाजिक विभागाच्या खर्चात देखील 14 हजार 734 कोटींची कपात करण्यात आली असून या विभागातील सर्वच विभागात निधीची कपात झालेली आहे. दरवर्षी त्यामध्ये भर पडत असून कर्जामध्ये मात्र वाढ होत आहे. सामाजिक सेवांवरील खर्चाला कात्री लावून राजकोषीय स्थैर्य आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा अहवाल 'समर्थन'ने दिला आहे.

कोल्हापूरच्या उत्पन्नात गत वर्षापासून वाढ

कोल्हापूर जिल्ह्याचे दरडोई जिल्हा उत्पन्न जरी राज्याच्या तुलनेत सातव्या क्रमांकावर असले तरी गेल्या काही वर्षांत जिल्हा दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. सन 2018-19 मध्ये एक लाख 88 हजार, सन 2019- 20 मध्ये एक लाख 94 हजार, सन 2020-21 मध्ये मात्र घट झाली असून ते एक लाख 77 हजारवर आले तर 2021- 22 मध्ये पुन्हा वाढ झाली असून दोन लाख आठ हजार रुपये इतके जिल्हा दरडोई उत्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news